आमच्या विषयी

देवगड, सिंधुदुर्ग

देवगड

देवगड हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्यात ९८ गावे आहेत. तालुक्याचे मुख्यालय देवगड हे गाव अरबी समुद्रातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण किनारपट्टीवर मुंबईच्या दक्षिणेस वसले आहे. देवगडला समुद्रकिनारा, एक छोटे बंदर आहे. समुद्र किनाऱ्यावरच्या देवगड किल्ल्यावर सन १९१५ साली बांधलेले एक दीपगृह आहे. देवगड तालुक्यातील दुसरा किल्ला विजयदुर्ग (घेरिया) हा शिलाहार राजघराण्यातील राजा भोज द्वितीय याने बांधला, त्यानंतर आदिलशाह, शिवाजी महाराज व शेवटी कान्होजी आंग्रे यांनी त्यावर राज्य केले. ब्रिटिश राज्यकर्ते, डच, पोर्तुगीज हे या किल्ल्याला त्याच्या अभेद्यपणासाठी "पूर्वेकडचे जिब्राल्टर" म्हणत.

देवगड हापूस

देवगड तालुका स्थानिक पातळीवर पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी जागतिक स्तरावर ओळखला जातो. [३] देवगड तालुक्यातील शुद्ध हापूस आंब्याच्या लागवडीमुळे संपूर्ण तालुक्याचा विकास झाला आहे. येथे पिकलेला आंबा हा त्याचा सुगंध, गुळगुळीत पातळ त्वचा आणि दाट केशरी गर यांसाठी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यात अन्यत्र पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. देवगड हापूस आंब्याची अशी लोकप्रियता आहे की, विक्रेते बहुतेकदा असेच दिसणारे आंबे देवगड हापूसच्या नावाखाली पाठवून ग्राहकांची फसवणूक करतात. देवगड येथील हापूस आंबा हा ४५,००० एकर क्षेत्रावर पिकविला जातो आणि वर्षभरात याचे चांगल्या वातावरणात उत्पादनामध्ये सुमारे ५०,००० टन उत्पादन होते. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड नावाच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भारतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. यात ७०० सदस्य असून, २०१३ साली या संस्थेस २५ वर्ष पूर्ण झाली.

देवगड किल्ला

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर, रत्‍नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला देवगड किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असलेल्या एका टेकडीवर बांधण्यात आला आहे. त्याच्या तीन बाजूंनी समुद्र आहे आणि दक्षिणेकडे तो जमिनीशी जोडलेला आहे. देवगड किल्ल्याच्या इतिहासाचा कालखंड रोमांचकारी आहे, त्यात युद्ध, पराक्रम आणि वारसा यांची गुंफण आहे.देवगड किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक स्मारक नसून तो मराठा साम्राज्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. हा किल्ला आपल्याला आपल्या इतिहास आणि वारसाबद्दल जाणीव करून देतो.न जिल्हा म्हणून घोषित झाला.